शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मलेशियात अडकलेल्या चार तरुणांना तीन महिने कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:20 IST

सांगली : नोकरीनिमित्त मलेशियात गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने तेथील तुरुंगात अडकलेल्या चारही तरुणांना मंगळवारी मलेशियाच्या न्यायालयाने

ठळक मुद्देभारतीय दुतावासातील कोणी आले नाहीत्यांचे कुटुंबीय देव पाण्यात घालून बसले होते

सांगली : नोकरीनिमित्त मलेशियात गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने तेथील तुरुंगात अडकलेल्या चारही तरुणांना मंगळवारी मलेशियाच्या न्यायालयाने तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. यामुळे या तरुणांच्या सुटकेसाठी देव पाण्यात घालून बसलेल्या त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. भारतीय दुतावासाने यात कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे नातेवाइकांना पदरमोड करून खासगी वकील द्यावा लागला.

सांगलीतील पोलिसपुत्र कौस्तुभ सदानंद पवार व धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ कुंभार (रा. शिरवळ, जि. सोलापूर), मोहन शिंदे (बेलवंडी, जि. अहमदनगर), दीपक माने (मानेवाडी, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले. मलेशियात गेल्यानंतर या तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली; पण वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली.

गुरुनाथचा मलेशियातील मित्र प्रशांत बंदीचौडे याने गुरुनाथ कुंभारसह चौघांना पोलिसांनी वर्किंग व्हिसा नसल्याने पकडल्याचे दूरध्वनीवरून कुटुंबियांना सांगितले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. तेव्हापासून नातेवाईक संशयित कौस्तुभशी संपर्क साधत आहेत. गुरुनाथ व अन्य तिघांना सोडविण्यासाठी वकील दिला असून, दोन दिवसांत मुले मलेशियाच्या तुरुंगातून सुटतील, असे कौस्तुभ सांगत होता; पण तो भूलथापा मारत असल्याचे लक्षात आल्याने गुरुनाथचे मेहुणे नामदेव कुंभार (इस्लामपूर) यांनी गेल्या आठवड्यात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

राज्यातील चार तरुण मलेशियाच्या तुरुंगात अडकल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होताच परराष्ट् सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी या तरुणांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. कागल (जि. कोल्हापूर) येथील प्रवीण नाईक मलेशियातील कंपनीत मुुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मुळे यांनी नाईक यांच्याशी संपर्क साधून या तरुणांना अ‍ॅड. जसओन विई हा वकील मिळवून दिला. अ‍ॅड. विई यांनी सोमवारी मलेशियाच्या तुरुंगात जाऊन चारही तरुणांची भेट घेऊन हे प्रकरण कसे घडले, याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली. मंगळवारी अ‍ॅड. विई यांनी या तरुणांची सुटका करावी, असा मागणीचा अर्ज केला. यावर हे तरुण फसवणूक झाल्यामुळे तुरुंगात अडकून पडले आहेत. गेल्या एक महिन्यापासून ते तुरुंगात आहेत. त्यांनी शिक्षा भोगली आहे. त्यामुळे आता दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून द्यावे, अशी मागणी विई यांनी केली.

मलेशिया सरकारतर्फेही वकिलांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायालयाने या चारही तरुणांना तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. मलेशियात बेकायदेशीररित्या राहिल्याचा ठपका ठेवून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. या तरुणांची सुटका व्हावी, यासाठी त्यांचे कुटुंबीय देव पाण्यात घालून बसले होते; पण त्यांना शिक्षा झाल्याने कुटुंबियांना धक्का बसला.

भारतीय दुतावासाचे कोणीही फिरकले नाहीगुरुनाथ कुंभार यांचे मेहुणे नामदेव कुंभार म्हणाले की, गेला एक महिना राज्यातील चार तरुण मलेशियाच्या तुरुंगात आहेत; परंतु भारतीय दुतावासाने त्यांना कोणतीही मदत केली नाही. तरुणांची तुरुंगात जाऊन त्यांनी भेटही घेतली नाही. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळीही भारतीय दुतावासाचे कोणीही न्यायालयाकडे फिरकले नाही. वास्तविक त्यांनीच वकील द्यायला पाहिजे होता. मात्र, त्यांनी कोणतीच मदत केली नाही. शेवटी आम्हीच चौघांनी वकील दिला. त्यांचे ६५ हजार शुल्कही आम्हीच दिले आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाचे पत्र घेण्यासाठीही भारतीय दुतावासातील कोणी आले नाही. प्रवीण नाईक यांनीच निकालपत्र घेऊन भारतीय दुतावासास दिले आहे.आणखी दोन महिने तुरुंगातबेकायदेशीरपणे मलेशियात वास्तव्य केल्याप्रकरणी सहा ते सात महिने शिक्षेची तरतूद आहे; पण अ‍ॅड. विई यांनी संशयित आरोपी वयाने लहान आहेत व त्यांना फसवून येथे आणल्याचे सांगितले. ही बाब लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना तीन महिने शिक्षा सुनावली आहे. गुरुनाथ कुंभारसह चौघे १२ नोव्हेंबरपासून तुरुंगात आहेत. मंगळवारी त्यांना तुरुंगात जाऊन एक महिना झाला. त्यामुळे न्यायालयाने सुनावलेल्या तीन महिन्यांच्या शिक्षेत हा महिना धरल्याने आणखी दोन महिने या तरुणांना शिक्षा भोगावी लागणार आहे.ज्ञानेश्वर मुळे यांना भेटणारनामदेव कुंभार म्हणाले की, या तरुणांच्या सुटकेसाठी आम्ही प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत. भारतीय दुतावासाशी पत्रव्यवहार करणार आहोत. तसेच दिल्लीत परराष्ट सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची भेट घेणार आहोत. चौघांना दंड भरून सोडावे, अशी मागणी न्यायालयात पुन्हा करणार आहोत.